नाशिक : कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळातील केंद्रीय कृषी मंत्रालयास राज्याच्या कृषी विषयक स्थितीची व्हिसीद्वारे माहिती सांगितली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या व्हिसीत ते बोलत होते.
केंद्रात काही सेव्हींग्जची रक्कम बाकी आहे. ती लवकरात लवकर राज्यास मिळावी. पोल्ट्री व दुध व्यवसायासाठी मदतीची गरज आहे ती केंद्राने लवकरात लवकर पाठवावी. राज्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतात व घरात अजुन कपाशी पडून आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ नसल्याने ती घरातच पडून आहे. फुले, द्राक्षे, कांदा यासारख्या पिकांना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध नाही. शेतकरी मोठ्या मेहनतीने धनधान्य पिकवतो. त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, असेही भुसे यांनी व्हिसीद्वारे केंद्रीय कृषी मंत्रालयास सांगितले.