मुंबई : मुंबई शहराला अन्नधान्याचा पुरवठा करणारे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सोमवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे.हे मुंबईतील उपनगर आणि शहराला भाजीपाला पुरवठा किनारे मार्केट आहे. मार्केटमधील एका मसाला व्यापाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लॉकडाऊनमुळे सर्वच भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.
त्यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता जास्त होतो. त्याच पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केटमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड आणि महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी भाजीपाला मार्केटमध्ये दररोज फक्त 200 गाड्यांना मार्केटमध्ये परवानगी दिली आहे. मात्र एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने मार्केटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे कांदा-बटाटा मार्केट सोमवारपासून तर भाजीपाला आणि फळ मार्केट शनिवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे आणि संजय पानसरे यांनी सांगितले आहे. मात्र धान्य बाजार सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. धान्य बाजारात ग्राहक कमी असतात. त्यामुळे आम्ही धान्य बाजार बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही असे ते म्हणाले. तसेच ग्राहकांनी बाजारात न येता घरूनच फोनवरून माल मागवावा असे अवाहन त्यांनी केल