मुंबई – उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून त्यांचे विरोधक विशेषत: मुख्यमंत्री गटाचे नेते त्यांच्यावर कालपासून टीका करत असताना उध्दव गटाचे नेते अरविंद सावंत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत याची तुम्हाला लाज वाटत नाही का असा सवाल त्यांनी विचारला आहे. एका वाहिनीशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात घराबाहेर पडले नाहीत किंवा मंत्रालयात गेले नाहीत अशी टीका तेव्हाही आणि आताही त्यांच्यावर केली जाते आहे. त्यावर बोलताना सावंत म्हणाले की, त्या अडीच वर्षांत काय सुरू होते त्याची सगळ्या जगाला कल्पना आहे. आपले सरकार आले आणि सणांवरचे विघ्न गेले असे बोलताना आणि धर्माच्या आधारावर राजकारण करताना, शेतकरी आत्महत्या करत असताना हे राजकारण करताना त्यांना लाज वाटली पाहिजे.