कारगिल – भारताने नेहमीच युद्धाकडे शेवटचा उपाय म्हणून पाहिले आहे, परंतु देशावर वाईट नजर टाकणाऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद आणि रणनीती सशस्त्र दलांकडे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कारगील मधील सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान आज तिथे गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी 1999 मध्ये कारगिल संघर्षानंतर या सीमावर्ती प्रदेशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली,त्यावेळी भारतीय सैन्याने “दहशतवादाचा विळखा ठेचून काढला” होता असे त्यांनी नमूद केले. दिवाळी “दहशतवादाच्या समाप्तीच्या उत्सवाचे” प्रतीक आहे असे ते म्हणाले.
A group of soldiers from Tamil Nadu enthralled us with this amazing performance… pic.twitter.com/I32Jsmwdk2
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2022
मी कारगिल युद्ध जवळून पाहिले आहे. हे माझे कर्तव्यच होते ज्याने मला कारगिलला परत आणले. त्यावेळच्या अनेक आठवणी आहेत, तेव्हा विजयाचे नाद चौफेर घुमत होते. कारगिलमध्ये आमच्या सशस्त्र दलांनी दहशतवादाचा धुव्वा उडवला होता आणि त्या वेळी साजरी केलेली दिवाळी अजूनही लोकांना आठवते. गेल्या आठ वर्षांत, सरकारने नवीन तंत्रज्ञान तैनात करून, सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा विकसित केल्या आणि सैन्यात महिलांसाठी पदे खुली करून सशस्त्र दलांमध्ये सुधारणा लागू करण्यावर भर दिला असे त्यांनी म्हटले आहे.
सशस्त्र दलांमध्ये महिलांचा समावेश केल्याने आमची ताकद वाढेल,असे मोदी म्हणाले आणि सशस्त्र दलांमध्ये अनेक दशकांपासून आवश्यक असलेल्या सुधारणा आता लागू केल्या जात आहेत असेही त्यांनी सांगितले. जेव्हा देशाच्या सीमा सुरक्षित असतात, अर्थव्यवस्था मजबूत असते आणि समाज आत्मविश्वासाने भरलेला असतो तेव्हा राष्ट्र सुरक्षित असते, असे पंतप्रधान म्हणाले.
Sharing some more glimpses from the Diwali celebrations in Kargil. Met soldiers from all across India. Their courage and resolve inspires all our citizens. pic.twitter.com/j9RiEjD0Rj
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2022
ते म्हणाले की आज भारत आपल्या बाह्य आणि अंतर्गत दोन्ही शत्रूंशी सामर्थ्याने सामना करत आहे. देशातील “दहशतवाद, नक्षलवाद आणि अतिरेकी कारवाया “उखडून टाकण्यासाठी सरकार मजबूतीने पावले उचलत आहे. भारताने कधीही युद्धाकडे पहिला पर्याय म्हणून पाहिले नाही. “आम्ही नेहमीच युद्धाला अंतिम उपाय म्हणून पाहिले आहे. आम्ही जागतिक शांततेच्या बाजूने आहोत.. पण सामर्ध्य प्रस्थापित केल्याशिवाय शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले.