Devendra Fadnavis On Uddhav Thackeray – रामराम भारतात नाही तर मग काय पाकिस्तानात जाऊन करायचं का? असा प्रश्न उपस्थित करत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
भाजपा राम नावावर निवडणूक लढवत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला होता, यावर फडणवीसांनी पलटवार केला आहे. तसंच, ठाकरेंना तुम्ही केलेला एकतरी विकास दाखवा, असा सवालही केला आहे
सोलापुरात पंतप्रधान मोदींची आज भव्य सभा झाली. या सभेपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ठाकरेंनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
मोदींना मत म्हणजे विनाशाला मत, विकासाला नाही. त्यामुळे जनतेने जागरुक राहावे, असे उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथील जाहीर सभेत म्हटले होते. मोदी मतांसाठी राम-राम करत फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
देवेंद्र फडणवीस हल्ली भाजप उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करु लागले आहेत. पण मी सांगतो. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे, असेही ठाकरे म्हणाले होते.
हे देखील नक्की वाचा….
PM मोदींनी पाहिलेलं नवीन स्वप्न काय आहे? स्वतः पंतप्रधानांनी सोलापूरच्या सभेत सांगितलं…..