मुंबई – दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला रोहित शर्मा याने आपण पूर्ण तंदुरुस्त झालो असून आता येत्या काळात भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आसल्याचे सांगितले. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने क्रिकेट कधी सुरु होईल याचीच सध्या वाट पाहात आहे, असेही रोहितने व्यक्त केले.
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत व्यस्त होता. त्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान रोहितला दुखापत झाली व त्याला दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले होते. त्यामुळे रोहितला कसोटी मालिकेतही खेळता आले नाही. दुखापतीमुळे एक चांगली मला खेळता आली नाही याचे वाइट वाटते आहे. मात्र, आता करोनाचा धोका कायम असल्याने सर्व प्रकारचे क्रिकेट बंद झाले आहे. क्रिकेट कधी एकदा सुरु होते व मला त्यात कधी खेळता येईल याचीच वाट पाहात आहे. खरेतर मला आयपीएलमध्ये खेळून भारतीय संघात पुनरागमन करायचे होते.
त्यासाठी मी नेटमध्ये कसून सरावही करत होतो. करोनाचा धोका इतका वाढेल याची कोणालाही कल्पना नव्हती, मात्र आता त्याची व्याप्ती पाहता नागरिकांचे जीव महत्वाचे आहेत क्रिकेट नव्हे. त्यामुळे सध्यातरी वाट पाहण्याशिवाय आपल्या हाती काहीच नाही, असेही रोहित म्हणाला.