मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अपात्र ठरल्यास अजित पवार ( Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार? या चर्चेवर बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) म्हणाले की, असे होऊ शकत नाही, असे झाल्यास मोठ्या प्रमाणावर भाजपला परिणाम भोगावे लागेल.
याचे कारण म्हणजे, एकनाथ शिंदे यांचे देखील 5 ते 10 टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास तुमचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाही, असा इशारा माजी मंत्री कडू यांनी भाजपला दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजितदादा मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. कडू पुढे म्हणाले की, आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. कारण विकासावर मते घेऊ शकले नाही.
आता निवडणूकित समाजात आरक्षणावर मते मागितली जाणार जातीचे मुद्दे घेऊन मते मागणार असा टोला त्यांनी लगावला आहे. मराठा आरक्षणानंतर धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वच समाज आक्रमक झाला. सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपायला पाहिजे. एकीकडे लोक आरक्षण मागत आहेत तर दुसरीकडे कंत्राटी नोकर भरती केली जातेय.
अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन झाले का कधी? तो किती काम करतोय, पगाराप्रमाणे तो काम करतोय का? मग कंत्राटी कडून अपेक्षा काय ठेवता? स्वच्छ प्रशासन लावून कंत्राटी भरायला काहीच हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.