नवी दिल्ली –दिल्लीतील विशेष न्यायालयाने राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), त्यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) आणि पुत्र तेजस्वी यादव ( Tejashwi Yadav) यांना समन्स बजावले (Court summons) आहे. रेल्वेतील जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी त्यांना 4 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्या प्रकरणी सीबीआयने याआधीच आरोपपत्र दाखल केले आहे.
लालू वर्ष 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री असताना तो घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्या काळात रेल्वेत नोकरी मिळालेल्या काही जणांनी लालूंच्या कुटूंबीयांना आणि निकटवर्तीयांना जमिनी दिल्याचे सांगण्यात येते. लालू आणि राबडी हे दाम्पत्य बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. तर, त्यांचे पुत्र तेजस्वी सध्या बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.