केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती
नवी दिल्ली – केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच इडुक्की जिल्ह्यात भूस्खलन झाले आहे. भूस्खलनग्रस्तांसाठी बचाव आणि मदत कार्यात स्थानिक प्रशासनास मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) ची टीम केरळच्या इडुक्की येथे पोहोचली आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिली.
Condolences to the bereaved families of those who have lost their lives in Rajamalai, Idukki(Kerala) due to landslide.
Have spoken to DG NDRF, their team has reached the spot to provide all possible assistance to the administration with the rescue work. May injured recover soon.
— Amit Shah (@AmitShah) August 7, 2020
केरळमधील इडुक्की येथे मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे भूस्खलनात चहा कामगारांची घरे नष्ट झाली आहेत.जिल्ह्याच्या राजमला परिसरात भूस्खलन झाले असून याठिकाणी पोहचणे अवघड आहे. यामध्ये 14 जणांचा मृत्यू तर 50 पेक्षा अधिक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांनी या घटनेबाबत ट्विट करत “भूस्खलनामुळे राजमालाई, इडुक्की (केरळ) येथे ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.
तसेच ट्विटमध्ये शाह म्हणतात, मी एनडीआरएफच्या डीजीशी बातचीत केली असून त्यांची टीम प्रशासनाला बचाव कार्यात सर्वतोपरी मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहचली आहे. या दुर्घटनेतील जखमीं लवकर बरे होवोत, असे देखील शाह यांनी म्हटले आहे.