नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. रिझर्व्ह बँकेच्या डेटाच्या आलेखाचे उदाहरण देत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या बाबतीत वाईट बातमी येण्याची शक्यता आहे, असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे.
राहुल गांधींनी पोस्ट केलेल्या ग्राफ्सवर ‘पीपल्स कॉन्फिडन्स लेव्हल’ लिहिलेले आहे. आणि स्त्रोत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ लिहिले आहे.
रिझर्व्ह बँकेचा हवाला देत राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये आलेख शेअर केला आहे. आरबीआयने ‘देशाचा खरा मूड’ उघड केला आहे. लोकांचा आत्मविश्वास आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला आहे. भीती आणि असुरक्षितता यांनी सर्वोच्च पातळी गाठली. अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या बाबतीत वाईट बातमी येण्याची शक्यता असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
कोरोनाव्हायरस, चिनी आक्रमण आणि अर्थव्यवस्था यावरुन कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सतत सरकारवर हल्लाबोल करत आहेत. देशात कोरोना बाधितांची संख्या 20 लाखांवर पोहोचली आहे. दरम्यान, राहुल गांधींनी आज सकाळी सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले, “२० लाखांचा टप्पा ओलांडला आहे, मोदी सरकार हरवले आहे.”