नगर -राष्ट्रवादीच्या वतीने विकास अजेंडा समोर ठेऊन कार्य चालू आहे. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता तन, मन व धनाने समाजकारण करीत आहे. शरद पवार विचार मंचच्या वतीने अल्ताफ सय्यद पक्षाच्या विचारधारेने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
तपोवन रोड येथे नागरिकांच्या सोयीसाठी शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी स्वखर्चाने पथ दिवे बसविले. या पथदिव्यांचा लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुध्दे, सुनिल त्रिंबके, राजीक सय्यद, शकिल सय्यद, राज मोहंमद सय्यद, कैस शेख, तन्वीर मन्यार, शाकीर सय्यद आदि उपस्थित होते.
तपोवन रोड, लक्ष्मीनगर थ्रिडी कॉर्नर परिसरात पथदिवे नसल्याने अंधारात अनेक लहान मोठे अपघात घडत होते. तर महिला व लहान मुलांना रात्री बाहेर पडणे अवघड झाले होते.
महापालिकेवर विसंबून न राहता अल्ताफ सय्यद यांनी स्वखर्चाने पथ दिवे बसविले. पथदिव्यांनी परिसर उजळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करुन आभार मानले.
अल्ताफ सय्यद यांनी या भागात अंधार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार विचार मंचच्या वतीने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून गरजूंना अन्नध्यान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरु आहे. विचार मंचच्या माध्यमातून नगर तहसिल कार्यालय, तोफखाना पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारात करोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून सॅनिटायझेशन कक्ष उभारण्यात आले आहे. तर चौका-चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसाठी पाणी, एनर्जी ड्रिंक, सॅनिटायझरचे देखील त्यांनी वाटप सुरु आहे.