मुंबई – “आदरणीय शरद पवार साहेब यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुठलाही फोन आलेला नाही, या अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका” असे विधान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केले आहे. आज मुंबईत राष्ट्रवादीची बैठक झाली, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान मोदीमध्ये कोणताही संवाद झालेला नसून त्यांच्यामध्ये फोनवरुन संवाद झाल्याची अफवा परसरवली जात असल्याचे मलिक यांनी सांगितले आहेत. “शिवसेनेला अडचणीमध्ये आणण्याचे काम भाजपकडून मागील पाच वर्षांपासून केले जात आहे. मोदी आणि पवारांमधील संवादाची बातमी पेरणे हा त्याचाच भाग असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये कोणताही संवाद झालेले नाही,” अशी माहिती मलिक यांनी दिली.
आदरणीय खा. शरद पवार साहेब यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुठलाही फोन आलेला नाही, या अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका.@PawarSpeaks @narendramodi @ANI @BBCPolitics @BBCHindi pic.twitter.com/XIgbjDvos0
— Nawab Malik (@nawabmalikncp) October 30, 2019