Nana Patole । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळ्याच पक्षाच्या जागावाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अजूनही काही सुटलेला नाही. असं असताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्द्वव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवर शिवसेनेकडून दोन वेळा महाराष्ट्र केसरी जिंकलेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावरून आता आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसतंय.
चंद्रहार पाटील त्यांच्या घोषणेनंतर आता हिरीरीने प्रचाराला लागले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय.
नाना पटोलेंची जाहीर नाराजी Nana Patole ।
नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणे हे अडचणीचं झालंय. महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नकोय. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य झालेलं नाही, अशा शब्दांत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.
सांगलीमुळे काँग्रेस-शिवसेनेत तू-तू मैं -मैं Nana Patole ।
सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपासून वाद चालू होता. आम्ही कोल्हापूरची जागा सोडली. त्यामुळे सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता. तर सांगली हा आमचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही ती जागा सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. काँग्रेस या जागेवर विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याच्या विचारात होती. मात्र उद्धव ठाकरेंनी भर सभेत चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे आता मविआमध्ये या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे.