Bollywood News । ‘दिल चाहता है’ नावाचा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत दिसले होते.
या चित्रपटात तीन मित्रांची कथा दाखवण्यात आली होती, जे कॉलेज पूर्ण केल्यानंतर वेगळे होतात. या मित्रांची कथा लोकांना खूप आवडली. या कलाकारां व्यतिरिक्त हा चित्रपट फरहान अख्तरसाठीही खूप खास आहे, कारण हा त्याचा दिग्दर्शित पहिला चित्रपट होता. आता फरहानने सांगितले आहे की तो या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार आहे.
इतक्या वर्षांनंतरही ‘दिल चाहता है’ लोकांच्या हृदयात इतका रुजला आहे की, चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते फरहानला या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल प्रश्न विचारत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
‘दिल चाहता है’ चित्रपटाच्या भागाबाबत फरहान म्हणाला, “मला वाटत नाही की मला ‘दिल चाहता है 2’ करण्याची गरज आहे. मला वाटते की चित्रपटाने जे करायचे होते ते केले. मला जे म्हणायचे होते ते मी बोललो.” त्यांच्या या मुलाखतीची क्लीपही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
फरहानने स्वतः अशाच एका चित्रपटात काम केले आहे, ज्याच्या सिक्वेलचीही मागणी होत आहे. तो चित्रपट म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ज्याचे दिग्दर्शन फरहानची बहीण झोया अख्तरने केले होते. या चित्रपटात फरहानशिवाय हृतिक रोशन आणि अभय देओल मुख्य भूमिकेत होते.
हे वाचले का ? ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक