पिंपळे गुरव – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने दत्तगड दिघीच्या डोंगरावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, कागद व इतर कचरा गोळा करण्यात आला. तुम्ही पर्यावरण वाचवा, पर्यावरण तुम्हाला वाचवेल, असा संदेश या वेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी नागरिकांना दिला.
पाचशे वर्षे नष्ट न होणार्या प्लॅस्टिकचा वापर करू नका. दत्तगडावर काही भक्त व ट्रेकिंगसाठी येणारे नागरिक पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांसाठी वापरलेला प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि डोंगराच्या पायथ्याशी मद्यप्राशन करून त्या ठिकाणी टाकलेल्या बाटल्या असे एकूण टेम्पोभर साहित्य मानवी हक्क संरक्षणच्या सदस्यांनी संकलित केले. पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजनची नितांत गरज भासणार आहे. प्रत्येकाने पर्यावरणासाठी झटले पाहिजे. मी प्लॅस्टिक टाकणार नाही, माझ्यामुळे पर्यावणाची हानी होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे.
वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करा, आपला वाढदिवसा दिवशी एक झाड लावून त्याचे संरक्षण करण्याच्या आवाहन त्यांनी या वेळी केले. अविरत श्रमदान दिघी संस्थेचे पदाधिकारी ऋषिकेश जाधव, जितेंद्र माळी हे अविरतपणे झाडांना पाणी घालून श्रमदान करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी गुणवंत कामगार गोरखनाथ वाघमारे, संगीता जोगदंड, शंकर नाणेकर, हभप शामराव गायकवाड, बाळासाहेब साळुंखे, शिवराम गवस, योगिता कोठारी, अमोल लोंढे, विकास शहाणे, धनंजय महाले, मयूर पाटील, भैरू गुरव, पिलानी घाटे सह अविरत श्रमदान संस्थेचे व मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अनेक पदाधिकार्यांनी सहभाग नोंदविला.