मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांशी संवाद साधला. दरम्यान, या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी “कोणी कितीही काहीजरी प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जाणारच”, अशी असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.
बैठकीनंतर मुख्यमनातरी उद्धव ठाकरे यांनी, “२४ वर्षांनी निवडणुका होत आहेत. शेवटची निवडणूक कधी झाली हे आपल्याला आठवावं लागतं. एक परंपरा पाळायला हरकत नव्हती. खरंतर ही एक विचित्र गोष्ट आहे. सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी आहेत. मात्र राजकारणात संभ्यता पाळायला हरकत नव्हती,” असे म्हटले.
दरम्यान, या बैठकीनंतर काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी या बैठकीत वेगळं काही बोललं गेलं नाही. महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असल्यानं आपले चारही उमेदवार निवडून येणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच “सत्तापिपासू लोकांना आपल्याला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपलं ऐक्य दाखवा, असे मुख्यमंत्री बैठकीत म्हणाल्याची माहिती अभिजीत वंजारी यांनी दिली आहे.
दरम्यान, या बैठकीत १२ अपक्ष आमदारांसह काँग्रेसचे ३२, शिवसेनेचे ४५, राष्ट्रवादीचे ४२ आमदार उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना निवडून आणा, ऐक्य दाखवा आणि मतदान करताना काळजी घ्या, असे शरद पवारांनी आमदारांना सांगितले आहे.