मुंबई – राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत भाजपकडून केल्या गेलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी मुंबईमध्ये विराट मोर्चा पुराकला होता. या मोर्चावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चावर खोचक टीका केली. देवेंद्र फडणविस यांनी म्हटले की,“मोर्चा तर लहानच ( नॅनो ) झाला. तसेच मोर्चासाठी पैसे देऊन लोक जमवल्याचा आरोपावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी मोर्चासाठी जमलेल्यांना पैसे वाटले जात असल्याचा एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. या व्हिडिओवरून अजित पवार यांना पत्रकरांकडून विचारले असता ते म्हणाले की, “माझ्या माहितीप्र्माणे अजिबात तसं झालेलं नाही. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोर्चात होतो. मोर्चा संपल्यानंतरही मी काही काळ तेथील लोकांशी बोलत होतो. अशाप्रकारे काहीही झालं नाही. मला लोक पैसे घेऊन आणलेले दिसले नाहीत. कारण नसताना बदनामी करण्याची गरज नाही”. असेही ते म्हणाले आहे.