Master Tara Singh । शिरोमणी अकाली दल (एसएडी)चे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्र लिहत मागणी केली आहे. या पत्राद्वारे पंजाबचे दिग्गज नेते मास्टर तारा सिंग यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करण्यात आली.
सुखबीर सिंग बादल यांनी १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या पत्रात, ‘आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि सध्याच्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशसह पश्चिम पंजाबला भारतात ठेवण्यासाठी तारा सिंह यांचे योगदान अद्वितीय आणि निर्णायक होते.’ असे नमूद करण्यात आलीये.
पात्रात पुढे लिहिण्यात आले आहे की,’भारत रत्न हा सन्मान त्यांना खूप आधी मिळायला हवा होता. आता वेळ आली आहे की ही चूक सुधारली पाहिजे आणि मास्टरजींना देशाचा सर्वोच्च सन्मान द्यायला हवा… मास्टर तारा सिंग यांनी त्यापूर्वीच्या दिवसांत तत्कालीन संयुक्त पंजाबच्या पश्चिम टोकापासून दिल्लीपर्यंत कसा प्रवास केला होता. भारताचा भाग म्हणून ठेवण्यासाठी एकट्याने लढा दिला. जिना यांची या भागावर लोभी नजर होती, त्यांना संपूर्ण पंजाब पाकिस्तानात हवा होता. मात्र अशावेळी मास्टर तारा सिंग यांनी लढा दिला.’
मास्टर तारा सिंग यांचे महत्त्वाचे योगदान
‘तारा सिंग यांचे आमच्या स्वातंत्र्यासाठी आणि सध्याच्या पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशसह भारतातील पश्चिम पंजाब राखण्यात अनन्यसाधारण आणि निर्णायक योगदान आहे. त्यामुळे भारतरत्न म्हणवून घेण्यास योग्य कोणी भारतीय असेल तर ते मास्टर तारा सिंग आहे.’
यंदा पाच जणांना भारतरत्न मिळाले
केंद्र सरकारने यावेळी पाच जणांना भारतरत्न पुरस्कार दिला.. एकाच वेळी इतक्या लोकांना हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नरेंद्र मोदी सरकारने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा सर्वप्रथम केली. त्यानंतर काही दिवसांनी हा पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, पी.व्ही. नरसिंह आणि एमएस स्वामीनाथन यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.