Manoj Jarange : ठाण्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी जरांगे यांच्या दारु पिऊन किडन्या किडल्या अशी जहरी टीका केली होती. भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेनी प्रत्युत्तर देत थेट भुजबळांना ओपन चॅलेंज दिले आहे. यावेळी बोलताना त्यांनी, “मी जन्मल्यापासून आतापर्यंत दारू जरी शिवली असेल, तर मी जिवंत समाधी घेईल. माझी नार्को टेस्ट करा, असे मनोज जरांगे यांनी आव्हान दिले आहे.
छगन भुजबळ यांनी काल केलेल्या आरोपांवर बोलताना मनोज जरांगे यांनी. मी जन्मल्यापासून आतापर्यंत दारू जरी शिवली असेल,तर मी जिवंत समाधी घेईल. माझी नार्को टेस्ट करा ,आणि नाही आढळल्यास त्यांनी तरी समाधी घ्यावी. विरोध करणाऱ्यालाच माणूस बोलतो, म्हणून भुजबळला विरोध आहे. आमच्याकडेही त्यांची माहिती आहे. मी जर काही सांगितलं तर ते सगळे सोडून हिमालयात जाईल. भुजबळांच्या दोन-तीन वाईट घटना मला पुराव्यासकट माहिती आहेत,” असे म्हणत त्यांनी थेट भुजबळांना इशाराच दिला आहे.
पुढे त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना,”सरकारने उपोषण सोडताना त्यावेळी ठरलेले प्रामाणिकपणे सभागृहात उत्तर देऊन कायदा पारित करावा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. स्वतंत्र आरक्षण टिकतच नाही, स्वतंत्र म्हणजे नेमकं कसं हे स्पष्ट करा, असे देखील म्हटले.
तसेच गिरीश महाजनांनी भुजबळांना समजावून सांगावं. त्यांना येरवाड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून गोळ्या सुरू कराव्यात. ते पागल आणि बधीर झालंय. गोरगरीब छोट्या छोट्या ओबीसी समाजातील जातींचा त्याला शाप लागलाय,अशी टीका देखील त्यांनी केली. तर दुसरीकडे जरांगे आणि भुजबळ यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर मंत्री गिरीश महाजन म्हणााले, मी दोन्ही नेत्यांना विनंती करणार आहे.आपआपसात तेढ निर्माण होईल असे कुणी बोलू नये. विषय दोन्ही कडून संपले पाहिजे संयम ठेवण्याची भूमिका घ्यावी. अशी विनंती त्यांनी केली.