Gaurish Maharaj । लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा उद्या पार पडणार आहे. देशातील ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, “देशात प्रभू श्रीरामाचे मंदिर झाले आता कैलासासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडून द्या” असे आवाहन गुवाहाटीच्या पुजाऱ्यांनी केले आहे.
कैलासासाठी सर्वधर्मीयांना भाजपला मतदान करा Gaurish Maharaj ।
गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे पुजारी असलेल्या गौरीश महाराज यांनी हे विधान केले आहे. “भारताचे हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी हे महत्त्वाचे आहे. काही निर्णय घेण्यासाठी बहुमत नाही तर प्रचंड बहुमत लागते आणि ते महत्त्वाचे आहे. मी स्वत: दोनदा कमळाचे बटन दाबलं. मला प्रभू श्रीराम भेटले. मी तिसऱ्यांदा बटन दाबलं तर तर मला कैलास भेटेल,” असे गौरीश महाराज यांनी म्हटले. तसेच त्यांनी सर्वधर्मीयांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
भाजपला पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत बसवा Gaurish Maharaj ।
कैलास पर्वत हे सर्वधर्मीयांचे महत्त्वाचे ठिकाण असून कैलासापर्यंत जाण्याचा मार्ग जवळपास 80 टक्के पूर्ण झाला आहे. आता अवघा 20% मार्ग बाकी असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यामुळे आता सर्वधर्मीयांनी तिसऱ्यांदा कमळ बटन दाबून भाजपला पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत बसवावे, असे आवाहन गौरीश महाराज यांनी केले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एका सभेत भाजपच्या एक जाहिरातीवरून टीका केली. या जाहिरातीत “तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा? भारतात की पाकिस्तानात?”असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी हाच धागा पकडत म्हटले की, भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल, मोदीजी तुम्ही हरले तर भारतात जल्लोष होईल. काश्मीरमध्ये आजही हल्ले होत आहेत, मग तुम्ही 10 वर्ष काय खुर्च्या उबावताय. आता मोदीजी काय करताय? महागाई वर बोलताना दिसतात का? रोजगारावर बोलतात का? तर आता ते धर्माधर्मात तेढ निर्माण करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.