Manoj Jarange । माझा गेम करण्याचा प्रयत्न होता, माझा एन्काऊंटर करूण नाही तर माझ्या सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. यामुळेच मी सलाईन घेणं बंद केलं असल्याचं जरांगे म्हणाले.
ते पुढे म्हणाले,’सरकार माझ्या मरणाची वाट पाहत आहे त्यांना कसही करून मला संपवाचं आहे, यामध्ये सरकारमधील मोठ्या नेत्यांचा हात असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.’
मी सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर आतापर्यंत केलेला हा सर्वात मोठा आरोप आणि गंभीर आरोप आहे. देवेंद्र फडणवीस यांना माफी मागावी लागली त्यामुळे ते राग काढत असल्याचेही जरांगे म्हणाले.’
मनोज जरांगे आज पायी उपोषण करत मुंबईतील सागर बंगल्यावर निघाले आहे. सगेसोयरे याची अंबलबजावणी आहे आणि मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण दयावे, यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सरकारवर जहरी टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, , उपमुख्यमंत्री अजिबात पवार यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. मला संपवण्याचा प्रयत्त्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा
मनोज जरांगेचे थेट आव्हान ; म्हणाले,”फडणवीसांना एवढी खुमखुमी असेल तर…”