Manoj Jarange । मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज (रविवारी) आक्रमक भूमिका मांडली. राज्यचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप त्यांनी यावेळी केली. मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांना आता भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे आज मुंबईतील सागर बंगल्याकडे निघाले आहेत. सगेसोयरे याची अंबलबजावणी करा आणि मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दया, या मागणीसह मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सरकारवर जहरी टीका केली. ( Manoj Jarange )
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी ते शरद पवार यांची स्क्रिप्ट वाचतात. असा आरोप केला होता. यावर आज माध्यमांशी बोलतांना जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे म्हणाले, ‘एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचेही काही चालत नाही. आपण कोणत्या पक्षाचे आहोत, यावरुन आरोप केले जात आहे. मी आताच सांगतो, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी समाजाचा आहे. समाज माझ्यासाठी देव आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ( Manoj Jarange )
दरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
हेही वाचा
Manoj Jarange । मनोज जरांगे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप,’माझा गेम करण्याचा प्लान…’
मनोज जरांगेचे थेट आव्हान ; म्हणाले,”फडणवीसांना एवढी खुमखुमी असेल तर…”