Sharad Pawar On Narendra Modi – देशाच्या स्वातंत्र्य लढाईनंतर संसदीय लोकशाही पद्धतीने आणि आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नावलौकीक जगात करण्याचे ऐतिहासिक काम नेहरूंनी केले. त्यांच्यावर टिका करण्याचे काम तुम्ही करता. तुम्ही प्रधानमंत्री म्हणून सर्वांना घेऊन चालले पाहिजे, पण ती भूमिका त्यांची नाही.
तसेच त्यांच्याकडून केवळ जाती जातीत, धर्माधर्मात अंतर निर्माण होईल असे भाष्य केले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वसर्वा शरद पवार यांनी केले. सोलापूर दौऱ्यात माळशिरस आणि पंढपुरात त्यांनी आज सभा घेतली. या सभेतून त्यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
मोदींकडून जातीय तेढ निर्माण करणारी भाषणे केली जात असल्याचा आरोप शरद पवारांनी पंढपुरातील सभेतून केला. दरम्यान, शरद पवारांनी आज सकाळी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अभिजीत पाटील हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
शरद पवारांनी पंढरपूरच्या सभेत सोलापूर जिल्ह्याच्या आठवणी जागवल्या. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम पाहिल्याची आठवण सांगताना जुन्या आणि नव्या पिढीतील राजकारणावर भाष्य केले. तसेच, सध्या देशात असलेल्या मोदी सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली.
शरद पवार म्हणाजे, देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या गृहस्थांच्या हाती आहे. लोकशाहीत सत्ता कोणालाही मिळते. ती लोकांसाठी चालवण्याचा अधिकार असतो. पण मिळालेली सत्ता जमीनीवर पाय ठेवून लोकांसाठी चालवायची भूमिका आज प्रत्येकाने घेतली पाहीजे. आज मोदींच्या हाती सत्ता असताना ते महाराष्ट्रात आणि देशात हिंसक भाषण देतात.
जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, राहूल गांधी यांच्यावर टिका करतात. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. त्यांनी प्रत्येक नागरिक हा आपला आहे, त्याचे आपण घटक आहोत, ही दृष्टी कायम ठेवली पाहिजे. पण जवाहरलाल नेहरूंवर टिका करण्यासाठी मोदी आपला वेळ घालवतात, अशा शब्दात त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला.