Manoj Jarange on agitation। मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात समंत झाले. या विधेयकानुसार मराठ्यांना १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारने मांडलेल्या विधेयकाचे मनोज जरांगे यांनी स्वागत केले.मात्र त्यांनी सगेसोयरे या शब्दासह आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली.
Manoj Jarange on agitation। 24 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज निर्णायक बैठक बोलावली होती. या बैठकीत 24 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. तोपर्यंत दोन दिवसांची मुदत सरकारला देण्यात आलीय. त्यानंतर 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात प्रत्येक गावात एकाचवेळी रास्ता रोको करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, हे सर्व आंदोलन शांततेत करण्याच्या सूचना मनोज जरांगे यांनी बैठकीत दिल्या आहे. विशेष म्हणजे रोज सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार आहे.
Manoj Jarange on agitation। ‘निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर..’
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सगेसोयरे मुद्यावरून सरकारला घेरले ते म्हणाले,’शिंदे सरकारनं सगेसोयरेबाबत जी अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती. विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं काय केले?, असा सवाल उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी विचारला. ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही स्वत:ला मोठे समजत असाल पण जनता समजत नाही. मोटारसायकल दिली पण पेट्रोल दिलं नाही अशी अवस्था आहे. जर तुम्ही सगेसोयरेबाबतची अंमलबजावणी करून मराठा आरक्षण दिले असते तर १५ दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला निसता, असे म्हणत जरांगे यांनी आंदोलनाची पुढील दिशा सांगितला. तसेच, २४ फेब्रुवारीपासून आंदोलन करणार असून आगामी निवडणुका न घेण्याची मागणीही जरांगे यांनी केली आहे.’
हेही वाचा
आरक्षणासाठी मराठ्यांचा आता शेवटचा लढा ; मनोज जरांगेंनी आक्रमकपणे सांगितली आंदोलनाची दिशा
Yugendra Pawar। अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा,’युगेंद्र…जोगेंद्र कुणीही येऊ द्या, महाभूकंप होणार’