सातारा – मदन भोसले यांनी कारखान्याच्या कामगारांचे पगार थकवले. शेतकऱ्यांचे वाटोळं केले आहे. त्याप्रमाणे ते मतदारसंघाचेसुद्धा वाटोळे करतील, असा हल्लाबोल वाई पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषाताई गाढवे यांनी केला.
“लक्ष्मणराव पाटील, मदनआप्पा पिसाळ यांची विकासकामांची परंपरा मकरंद पाटील यांनी जपली आहे. म्हणूनच या तिन्ही तालुक्यांतील आबालवद्ध मकरंदआबांच्या पाठीशी आहेत,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोपर्डी (ता. वाई) याठिकाणी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत गाढवे बोलत होत्या. आमदार मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, मदन आप्पा भोसले, विजयसिह पिसाळ, शारदाकाकी ननावरे, हेमलता ननावरे, केशव आबा गाढवे, तानाजी कचरे, राजू बापू गाढवे, प्रल्हाद नाना गाढवे, औदुंबर महाराज, अविनाश गाढवे, मनीष भंडारी, संजय लोंढे, मोनू पिसाळ आदी प्रमुख उपस्थित होते. सर्वांगीण विकासासाठी मकरंद पाटील यांनाच निवडून देण्याचे आवाहन मनीषाताई गाढवे यांनी केले.
राजू बापू गाढवे म्हणाले, “मदन भोसले आमच्या गावात येऊन विचारतायत की आमदारांनी काय केलं, बोपर्डीसारख्या गावासाठी मकरंद आबांनी तब्बल बारा कोटी 60 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आमचा कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवला.
आरोग्य केंद्राला एक कोटी 62 लाख, डांबरीकरण, समाजमंदिर करून दाखवलं. म्हणून आता आपली जबाबदारी आहे की आबांनी काय काय केलंय हे विरोधकांना दाखवून देऊ.” मकरंद आबा आपल्यासाठी चार वर्षे 11 महिने झटले. म्हणून आता त्यांना विजयी करून आपण त्यांच्या कष्टाची उतराई करायचीय, असे अविनाश गाढवे यांनी सांगितले.