पुणे: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात यजमान महाराष्ट्र पराभवाच्या छायेत आहे. जम्मू-काश्मीरच्या दीडशतकी धावांसमोर महाराष्ट्राचा पहिला डाव केवळ 109 धावांत संपला.
सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जम्मू-काश्मीरने आपल्या दुसऱ्या डावात 4 गडी गमावुन 155 धावा केल्या असून त्यांच्याकडे 255 धावांची भक्कम आघाडी आहे.
कालच्या 3 बाद 51 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. उस्मान नझीर मीरने 5 गडी बाद करत महाराष्ट्राच्या डावाला खिंडार पाडले.
पहिल्या डावात 100 धावांची आघाडी मिळालेल्या जम्मू-काश्मीरने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवस अखेर 4 बाद 155 धावा करत एकूण आघाडी 255 पर्यंत वाढविली. सूर्यांश रैना 79 धावांवर खेळत आहे. सामन्याचे अजून दोन दिवस बाकी असून महाराष्ट्राचा पराभव स्पष्ट दिसत आहे.