शाळेला जाण्यासाठी गुडघाबर पाण्यातून काढावी लागती वाट
नदीवर पूल बांधून देताय का पूल विध्यार्थीची प्रशासनाकडे मागणी ?
हिंगोली, {शिवशंकर निरगुडे } – हिंगोली तालुक्यातील काळकोंडी हे जेमतेम दिड दोन हजार लोकवस्ती असलेले गाव असून येथील विद्यार्थ्यांना नर्सी येथील शाळेत जाण्यासाठी नदिच्या पाण्यातून पायपीट करीत शाळा गाठावी लागत असल्याने येथील विद्यार्थ्यांना हा रस्ता नित्याचाच झाला असल्याने शाळेला चल माझ्या दोस्ता पाण्यातून आहे आपल्या शाळेचा रस्ता ही म्हण येथील विद्यार्थ्यांसाठी तंतोतंत लागू पडत आहे.
काळकोंडी या ठिकाणी पहिली ते आठवी पर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नर्सी येथे जावे लागते. नर्सी ते काळकोंडी हे तीन किलोमीटर अंतर असून या दरम्यान गावाच्या दक्षिणेला लागूनच कयाधू नदी वाहते. येथील नदीवर पूल नसल्याने येथील विद्यार्थ्यांना नदीच्या कमरेइतक्या पाण्यातून वाट काढावी लागते.
विशेष म्हणजे नदीच्या पात्रात खडकाचे शेवाळलेले गोटे असल्याने मोठ्या कसरतीने पाऊल टाकीत नदीच्या पात्रातून चालावे लागते.
घाई गडबडीत थोडे जरी पाऊल अडखळले तर पाण्यात पडण्याची फार भिती असते विद्यार्थ्यांसह येथील ग्रामस्थांना तसेच शेतकऱ्यांना सुध्दा पूला अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येथील एकूण ४० मुलं मुली हे शिक्षण घेण्यासाठी नर्सी येथील शाळेत सध्या येत असून येथील विद्यार्थ्यांना जवळपास पाच ते सहा महिने अतिशय कठीण परिस्थितीतून शाळेला यावे लागते. येथील नदीवर पूल उभारण्यासाठी ग्रामपंचायत कडून प्रशासनाकडे दोन वर्षांपूर्वी लेखी प्रस्ताव पाठविण्यात आला होता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील वर्षी नदी व रस्त्याचे मोजमाप देखील केले आहे.
मात्र त्यानंतर पूल उभारणीसाठी कोणतीही हालचाल अद्याप पर्यंत झालेली दिसत नाही त्यामुळे येथील पूलाचा प्रश्न भविष्यात मार्गी लागणार कि नाही हे अजून तरी कळायला मार्ग नाही.
विध्यार्थीना पाण्यातून येतांना आपले दप्तर व कपडे डोक्यावर घेऊन नदी पार करावी लागत आहे आत्ता तरी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी तात्काळ फूल बांधून देण्यात यावा
मागील अनेक वर्षांपासून येथील नदिवर पूल नसल्याने आमच्या येथील विद्यार्थ्यांना नर्सी येथील शाळेत चिखल व पाण्यातून वाट काढतच शाळा गाठावी लागते शासनाने नदीवर पूल बांधून द्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही.
विद्यार्थी, वैजनाथ गजानन जाधव,इयत्ता ९ वी
पूलाअभावी आम्हाला दररोज नदीच्या पाण्यातूनच शाळेला जावे लागते नदीच्या पाण्यातील रस्ता धोकादायक झाला असून शिवाय नदीत पाणी जास्त असल्याने कपडे सुद्धा ओले होतात.मात्र दुसरा रस्ता नसल्याने नाईलाजाने याच रस्त्यावरुन शाळेला ये जा करावी लागते
या ठिकाणी नदीवर पूल बांधल्यास याचा पुढील पिढीला त्रास होणार नाही.
विद्यार्थी, चैतन्या नवनाथ गावंडे,इयत्ता १० वी