मुंबई – देशामध्ये महागाई संपवायचं काम आणि रोजगारनिर्मिती हे फक्त काँग्रेसच करू शकते. त्यामुळे केंद्राचं सरकार हे काँग्रेसला चालवायला द्या ! अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
याबाबतचे ट्विट त्यांनी केलं असून ते पुढे म्हणतात की, “नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान 2014 मध्ये झाले. ते देशाच्या जनतेला बेरोजगारी आणि महागाई संपवणार हे आश्वासन देऊन सत्तेत आले. पण मोदीजी जेव्हापासून सत्तेत आले आहेत. तेव्हापासून एका तरी जीवनावश्यक वस्तूची किंमत कमी झाली? यांच उत्तर आहे, “नाही!”
केंद्राचं सरकार हे काँग्रेसला चालवायला द्या!#Congress#India pic.twitter.com/wCMY8upsoN
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 8, 2022
आरक्षणाबाबतीत पुतणा मावशीचं प्रेम भाजपाने दाखवू नये.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतजी यांनी अनेकदा सांगितलं, आम्हाला आरक्षण नको आहे. आरक्षणमुक्त भारत असावा! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा हे काही वेगळे नाहीत. त्यामुळे आरक्षणाबाबतीत पुतणा मावशीचं प्रेम भाजपाने दाखवू नये.
भाजपा ही ओबीसी,एस.सी, आदिवासी या कोणाच्याही समर्थनात नाही. ते आरक्षणाविरोधी आहेत. केंद्रात बसलेलं भाजपाचं सरकार संविधानाचा सन्मान करत नाही, मात्र काँग्रेसने नेहमीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान केला, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.