मुंबई – कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कंगनाने राज्य सरकारविरोधात वक्तव्ये केल्यानंतर एका दिवसात तिचे कार्यालय पाडण्यात आले. याविषयी राज्यपाल नाराज आहेत. तर यातच इंग्रजी वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कंगना रणौत रविवारी १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, राजभवनावर संध्याकाळी साडेचार वाजता कंगना राज्यपालांची भेट घेणार आहे. या भेटीमागचं कारण काय आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
तत्पूर्वी, कंगना हिच्या मुंबईतील बंगल्यात जे अनाधिकृत बांधकाम झाले आहे, त्या संबंधात मुंबई महापालिकेने तिला दोन वर्षांपुर्वीच नोटीस दिली आहे आणि त्याच वेळी ती या नोटीशीच्या विरोधात कोर्टातपण गेली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम केवळ 24 तासांची नोटीस देऊन कसे पाडले असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्या पार्श्वभूमीवर महापालिका सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.