मुंबई – पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप आणि रब्बी पिकांसह फळपिकांचा विमा एक रुपयात काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. याबाबत कृषिमंत्री सतत आपल्या भाषणात उल्लेख देखील करताना पाहायला मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात एक रुपयात विमा देण्याचा सरकारी आदेशच निघाला नसल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
काही पिकांचा विमा भरण्याची मुदत संपली असून, अजूनही सरकारने आदेश काढला नसल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. दानवेंनी पुढे म्हटले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अजून एक ठेंगा या खोके सरकारने दिला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अजून एक ठेंगा या #खोके #सरकारने दिला आहे. शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा देण्याची घोषणा महाशक्तीच्या महाराष्ट्र शाखेने केली होती. परंतु त्याचा सरकारी आदेश अजून काढलेलाच नाही. खरीप हंगामातील पीक विम्याचा हफ्ता भरण्याची मुदत काही पिकांबाबत आटोपली, काहींची…
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 25, 2023
शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्याची घोषणा महाशक्तीच्या महाराष्ट्र शाखेने केली होती. परंतु त्याचा सरकारी आदेश अजून काढलेलाच नाही. खरीप हंगामातील पीक विम्याचा हफ्ता भरण्याची मुदत काही पिकांबाबत आटोपली, काहींची आटोपण्यात आली आहे. शेतकऱ्याला पीक विम्याचे संपूर्ण पैसे भरल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण या योजनेचा आदेशच सरकारने अजून काढलेला नाही.