पुणे: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आजपासून सुरु झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने जम्मू-काश्मीरला 209 धावांत गुंडाळले. मात्र हे समाधान महाराष्ट्रासाठी फार काळ टिकले नाही, त्यांचाही पहिला डाव पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 3 बाद 51 असा घसरला.
आजपासून सुरु झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अहमद बंदेने 76 व अबिद मुश्ताकने 50 धावांची दमदार खेळी केल्याने त्यांना द्विशतकी धावांचा पल्ला गाठला. संकलेचाने 4 तर दिग्विजय देशमुख, मुकेश चौधरी व सत्यजित बच्छाव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
जम्मू-काश्मीरला 209 धावांवर रोखल्यानंतर महाराष्ट्राच्या फलंदाजांनीही बेजबाबदार खेळ केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुर्तझा ट्रंकवाला 31 धावांवर खेळत आहे. नाईट वॉचमन सत्यजित बच्छाव बाद झाल्यावर पंचांनी खेळ थांबविला. महाराष्ट अजूनही 158 धावांनी पिछाडीवर आहे.