नवी दिल्ली – एअर इंडियाच्या विमानातून इराण मध्ये अडकलेल्या 53 भारतीयांना आज भारतात आणण्यात आले असून त्यांची रवानगी राजस्तानातील जैसलमेर येथील लष्कराच्या वेलनेस कॅम्प मध्ये करण्यात आली आहे. इराणहून भारतात परतलेली ही चौथी तुकडी आहे.
या चारही तुकड्यांमध्ये आत्तापर्यंत एकूण 389 भारतीय नागरीक इराणहून येथे परत आणण्यात आले आहेत. या सर्वांनाच जैसलमेर येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्या आरोग्याची पुर्ण तपासणी केल्यानंतरच त्यांना तेथून घरी सोडण्यात येणार आहे.
आज 53 भारतीयांना घेऊन येणारे विमान दुपारी तीन वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर त्यांना एअर इंडियाच्या विमानातून जैसलमेरला नेण्यात आले. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की या सर्व प्रवाशांची विमान तळावर स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली. नंतर त्यांना तेथून राजस्तानात हलवण्यात आले.