नवी दिल्ली – चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूच्या धोक्यामुळे आता भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सुरू असलेल्या मालिकेतील उर्वरीत दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे.
India’s remaining two ODIs against South Africa in Lucknow and Kolkata called off in wake of COVID-19 pandemic: BCCI official
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2020
मालिकेतील उर्वरीत सामने 15 मार्च आणि 18 मार्च रोजी अनुक्रमे लखनौ आणि कोलकाता येथे होणार होते. याचसोबत २९ मार्चपासून सुरु होत असलेली आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने पुढे ढकलली असून आता ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे.
दरम्यान, याआधी भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील गुरुवारी होणारा पहिला सामना संततधार पाऊस व निसरडे मैदान यांच्यामुळे रद्द झाला. त्यानंतर करोना विषाणूच्या धोक्यामुळे लखनौ व कोलकाता येथे होणाऱ्या मालिकेतील उर्वरित दोन्ही एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना खेळविले जाणार होते.