नवी दिल्ली: भारत पाकिस्तान यांच्यात सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय लष्कराच्या चौक्यावर उखळी तोफांसह गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी जम्मू काश्मीरातील करमरा गावात तीन जिवंत मोर्टार शेल सापडले होते. आता त्या मोर्टार शेल भारतीय लष्कराने नष्ट केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH Indian Army yesterday destroyed 3 mortar shells of Pakistan Army that were found after the recent ceasefire violation in Karmara village of Poonch, Jammu and Kashmir pic.twitter.com/OpWTrBNpg6
— ANI (@ANI) October 22, 2019
त्यासाठी उखळी मोर्टार शेल नष्ट करतानाचा एक व्हिडीओ एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. जम्मू काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान सैरभैर झाला आहे. सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते भारताकडून पाकिस्तानच्या शस्त्रसंधीला सडेतोड उत्तर दिले जात आहे.
पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचेही प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, रविवारी पाकिस्तानकडून सीमेवर आगळीक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय लष्कराने जबरदस्त कारवाई करत पाकला उत्तर दिले आहे. याच कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.
यामध्ये जम्मू काश्मीरमधील करमरा गावात तीन पाकिस्तानी तीन जिवंत मोर्टार शेल आढळून आले. याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर जवानांनी हे शेल नष्ट केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे शेल नष्ट करतानाचा व्हिडीओही देखील समोर आला आहे.