दुबई – भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर आता आशिया क्रिकेट समितीने एक पाऊल मागे घेतले आहे. त्यानुसार या स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने अमिरातीत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
स्पर्धेतील अन्य सामने पाकिस्तानमध्येच होणार असून उपांत्य तसेच अंतिम सामन्यात एक संघ भारताचा असेल तर ते सामनेही अमिरातीत होतील, असेही सांगितले जात आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात राजकीय तणाव असल्यानेच केंद्र सरकारकडून भारतीय संघाला पाकिस्तानात खेळण्यासाठी नसल्याचे यापूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले होते. त्यावर जर भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार नसेल तर पाकिस्तानचा संघही विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतात येणार नाही, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिली होती.
#INDvAUS 2nd Test Day 1 : टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया 263 धावांत गारद
मात्र, आता भारताचे सर्व सामने पाकिस्तानच्या ऐवजी अमिरातीत होणार असल्याची शक्यता बळावल्याने या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.