दुबई : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी झालेल्या पाचव्या व अंतिम सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरूध्दची टी-२० मालिका ‘५-०’ ने जिंकली. पण पाचव्या सामन्यादरम्यान संथ षटकगतीसाठी भारतीय संघाला दंड आकारण्यात आला.
5th T20I. It's all over! India won by 7 runs https://t.co/3a7zBdAcuu #NZvInd
— BCCI (@BCCI) February 2, 2020
संथ षटकगतीसाठी सामना शुल्काच्या २० टक्के रक्कमेचा दंड भारतीय संघास आकारण्यात आला. सामनाधिकारी एलिट पॅनेलच्या ख्रिस ब्राॅडने हा दंड आकारला.
भारताने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले. सामन्याचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने चूक कबूल करून प्रस्तावित शिक्षा स्वीकार केली.