हैदराबाद : सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहा मिहिन्यांची इटर्नशीप पूर्ण केली आहे. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे ते चीनला जाऊ शकले नाहीत, त्यांना एमबीबीएसची पदवी मिळणार की नाही, याची चिंता सतावत आहे
चीनमधील वुहानमधून नुकत्याच आणलेल्या आणि विलगता कक्षात ठेवलेल्या तरूणांचाही यात समावेश आहे. त्यातील अनेक जण हिवाळ्याच्या सुटीत भारतात आले होते. ते आता कोरोनाच्या भीतीने परत जाऊ शकले नाहीत.
त्यांची इंटर्नशीप पूर्ण करू देण्यासाठी केंद्राला विनंती करावी अशी मागणी हे विद्यार्थी त्यांचे सल्लागार आणि विद्यापीठाकडे करत आहेत. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार सहा महिन्यांची इंटर्नशीप पूर्ण केल्याखेरीज एमबीबीएसची पदवी वैध मानता येत नाही.
चीनमधील कोरोना विषाणूंच्या साथीमुळे हे विद्यार्थी परत जाऊ शकले नाहीत. आरोग्यापेक्षाही त्यांना इंटर्नशीपमध्ये पडलेला खंड हा ब्रेक म्हणून धरणार का? आणि इंटर्नशीप पूर्ण न केल्याने अपात्र ठरवले जाणार का? की हा ब्रेक ग्राह्य धरून त्यांची पदवी वैध ठरवणार का? अशा चिंता त्यांना आरोग्यापेक्षा अधिक सतावत आहेत.
या पेचप्रसंगातून तोडगा काढण्यासाठी हे विद्यार्थी त्यांच्या प्रवेशावेळी असणारे सल्लागार किंवा मध्यस्थ यांच्याशी संपर्क साधत आहेत. भारतीय वैद्यकीय परिषदेवर असणाऱ्या एका वरीष्ठ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही वाट पहात आहोत. हा पेचप्रसंग आणखी किती काळ चालेल याची कल्पना नाही. एनईईटी परीक्षा दिल्याखेरीज या विद्यार्थ्यांना भारतात व्यवसाय करता येणार नाही. त्यांनी एनईईटीची तयारी करावी त्यात उत्तीर्ण व्हावे. त्यानंतर त्यांना भारतात व्यवसाय करता येईल. इंटर्नशीपच्या मुद्यावर चर्चा करता येईल. त्यावर तोडगा काढता येईल.