न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या पंधरा सदस्यांच्या सुरक्षा मंडळात अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताची आठव्यांदा तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी याविषयी दरम्यान, या विजयानंतर भारत २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य बनला आहे. १९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या ७५ व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य आणि आर्थिक तसंच सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती. भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळाले आहे.
India wins the United Nations Security Council elections as a non-permanent member from the Asia-Pacific category; it was standing unopposed from the block for 2021-22 term. This is for the 8th time that India has been elected to UNSC. pic.twitter.com/GjnS7969V1
— ANI (@ANI) June 17, 2020
विजयानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली. भारत नेतृत्व कायम ठेवणार असून उत्तम बहुपक्षीय प्रणालीला नवीन दिशा देणार असल्याचे ते म्हणाले. भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली. भारताची २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे मी खुश आहे. आम्हाला सर्वांचे उत्तम समर्थन मिळाले. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांनी जो विश्वास दाखवला त्याप्रती आदर व्यक्त करतो, असेच ते म्हणाले.
सुरक्षा परिषदेत भारताची निवड झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रामुख्याने करोनाच्या संकटकाळातील दूरदृष्टी आणि जागतिक नेतृत्व अधिक बळकट करते. भारत एका महत्त्वाच्या वेळी सुरक्षा परिषदेचा सदस्य बनला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कोविडदरम्यान आणि कोविडनंतरच्या काळात भारत कायम नेतृत्व करेल आणि एका चांगल्या बहुपक्षीय व्यवस्थेला नवी दिशा देईल, असेही तिरूमूर्ती म्हणाले.
आम्ही भारताचे मनापासून स्वागत करतो आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या यशस्वी निवडणूकीबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा या विषयांवर एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत, जी भारत आणि अमेरिका यांच्यातील सहभागाची जागतिक रणनीती आहे. भारताचा सदस्य होणे ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. पण तसे झाल्याने कोणतेही आभार कोसळणार नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली.