ढाका – भारत आणि बांगलादेश ( IND vs BAN ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना मीरपूर मैदानावर होत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारताच्या 4 बाद 45 धावा झाल्या असून विजयासाठी 100 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. परंतु आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केल्याने सामना रंगदार स्थितीत आहे.
विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप
बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलामीवीर कर्णधार लोकेश राहुल (2), चेतेश्वर पुजारा (6), शुबमन गिल (7) आणि विराट कोहली (1) हे झटपट बाद झाले. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने भेदक मारा करत तीन गडी बाद केले. तर शाकीब अल हसनला एक विकेट घेतली. सध्या अक्षर पटेल (26) आणि जयदेव उनाडकट (3) खेळपट्टीवर आहेत. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 100 धावांची गरज आहे.
विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप
भारताच्या हातात 6 विकेट्स असून ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना निर्णायक खेळी करावी लागणार आहे. तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला बांगलादेशने बिनबाद 7 या धावसंख्येपासून सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच सत्रात 71 धावांवर 4 गडी गमावले. त्यानंतर लिटन दास आणि झाकीर हसन यांनी शानदार अर्धशतके झळकावल्याने संघाला 231 धावांपर्यत मजल मारता आली. भारताकडून अक्षर पटेलने 3, तर आर. अश्विन आणि महंमद सिराजने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
विराटची निराशाजनक कामगिरी
सामन्याचा तिसरा दिवस कोहलीसाठी निराशाजनक ठरला. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात कोहलीने स्लिपमध्ये तब्बल चार झेल सोडले. यातील काही झेल अवघड होते, पण कोहलीने असे झेल घेणे अपेक्षित होते. यानंतर फलंदाजीत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात तो 22 चेंडूचा सामना करत फक्त एक धाव करून माघारी परतला.
Stumps on Day 3️⃣ of the second #BANvIND Test.#TeamIndia move to 45/4 & require 100 runs to win with @akshar2026 & @JUnadkat at the crease.
Scorecard – https://t.co/CrrjGfXPgL pic.twitter.com/d9w83R8qLt
— BCCI (@BCCI) December 24, 2022
चौथ्या डावात फलंदाजी करणं कठीण
आशियाई खेळपट्ट्यांवर चौथ्या डावात फलंदाजी करणे कठीण असते. मीरपूरमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉबे या संघाना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघालाही 100 धावांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी इंग्लंडला 2016मध्ये 274 धावांचे आव्हान मिळाले होते तेव्हा त्यांचा संघ 164 धावात बाद झाला होता. तर 2018 मध्ये वेस्ट इंडिजला 204 धावा करताना 139 धावांपर्यंतच मजल मारता आली होती.