ढाका – भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या ( IND vs BAN ) कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने दमदार कामगिरी केली होती. त्याने या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. तब्बल २२ महिन्यानंतर कुलदीपने भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्याच्या केएल राहुलच्या निर्णयावर मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता मालिका विजयानंतर केएल राहुलने कुलदीपला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
#INDvsBAN । सामन्यात OUT करणाऱ्या गोलंदाजाला विराटने स्वतःची जर्सी भेट दिली
पहिल्या ( IND vs BAN ) सामन्यात भारताने यजमान संघावर 188 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्याच्या दोन्ही डावांत कुलदीप यादवने एकूण 8 बळी घेतले होते. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला पहिल्या कसोटीत सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही कुलदीप शानदार गोलंदाजी करताना दिसेल, अशी सर्व चाहत्यांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. मीरपूरमधील दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघातून कुलदीपला वगळण्यात आले होते. याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
#INDvsBAN । सामन्यात OUT करणाऱ्या गोलंदाजाला विराटने स्वतःची जर्सी भेट दिली
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर केएल राहुल म्हणाला की,”“आयपीएलमध्ये लागू करण्यात आलेला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा नियम कसोटी सामन्यांमध्येही असता तर मी कुलदीप यादवला दुसऱ्या डावात नक्कीच परत आणले असते. कुलादीपला संघातून बाहेर ठेवणे एक कठीण निर्णय होता. कारण गेल्या सामन्यात त्याने आम्हाला बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून दिला होता. कुलदीपला त्या सामन्यासाठी सामनावीर पुरस्कार मिळाला होता. पण पहिल्या दिवशीची खेळपट्टी पाहिल्यानंतर आम्हाला जे वाटले त्या आधारे आम्ही निर्णय घेतला.”
“आम्हाला वाटले की ही खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही मदत करेल. मी कुलदीपला वगळले आणि मला या निर्णयाचा पश्चाताप नाही. तुमच्या लक्षात असेल तर या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी खूप विकेट घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाजांसाठी या खेळपट्टीवर मदत आणि बाउंस होता. त्याचबरोबर वनडे सामन्यात खेळण्याच्या आमच्या अनुभवाच्या आधारे आम्ही कुलदीपला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता.”
“Ideally, the impact player rule that has been introduced in IPL, had that been in Test matches as well, I would have definitely brought back Kuldeep Yadav in the second innings,” @klrahul said. #BANvIND https://t.co/Bt1tRwQUwA
— Circle of Cricket (@circleofcricket) December 25, 2022