पुणे – लष्करातर्फे 7 सप्टेंबर रोजी अहमदनगरमधील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे होणारी लष्कर भरती करोनामुळे पुढे ढकलण्यात आली असून, या भरतीबाबतची नवीन तारीख लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे जाहीर केली जाईल,
अशी माहिती लष्कर प्रशासनाने दिली आहे. लष्करातर्फे घेण्यात येणाऱ्या भरतीप्रक्रियेत पुण्यासह अहमदनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांमधील उमेदवारांचा
समावेश आहे. मात्र, करोनामुळे ही भरतीप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून, नवीन तारीख उमेदवारांना योग्यवेळी कळविण्यात येईल.