मुंबई : रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे होत असताना आता रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील ८ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी “आम्ही अजित पवारांना तोडलेलं नाही. ते स्वत: आमदार तोडून इकडे आले आहेत. शिवाय फक्त अजित पवारच नाही. काही दिवसांनी बिहारमध्येही अशाच प्रकारचं बंड होऊ शकतं. कारण नितीश कुमार यांच्या निर्णयांवर तिथली जनता आणि त्यांचे आमदार नाराज आहेत,” असे म्हणत त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
#WATCH | A similar situation (like currently in Maharashtra) can arise in Bihar soon as some JD(U) MLAs are upset with Nitish Kumar. In UP, Jayant Chaudhary can join with NDA as is currently upset with Akhilesh Yadav. There is a possibility that differences arise between MLAs of… pic.twitter.com/zNVB23c29w
— ANI (@ANI) July 3, 2023
पुढे बोलताना आठवले यांनी,”राजद सोडून ते भाजपाबरोबर आले. नितीश कुमारांचे ४५ आमदार निवडून आले असताना भाजपाचे ७७ आमदार असूनही मोदींनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. पण काही दिवसांनी ते पुन्हा राजदसोबत गेले. त्यामुळे नितीश कुमार यांच्याविरोधातही नाराजी आहे”, असेही रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र व बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशाचही विरोधकांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता रामदास आठवलेंनी व्यक्त केली. “उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत येऊ शकतात. ते पाटण्याच्या बैठकीला गेले नव्हते. आजकाल ते अखिलेश यादव यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे तेही आमच्याबरोबर येऊ शकतात. पुढे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या आमदारांमध्येही फूट पडू शकते”, असेही रामदास आठवलेंनी नमूद केले.