नवी दिल्ली – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे वादळ आले असून, पक्ष ९० जागांवर पोहोचत आहे. उत्तर प्रदेशात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत येत आहे. तर उत्तराखंड, गोव्यातही भाजप सरकारची पुनरावृत्ती करत आहे. मात्र यात ‘आप’चा पंजाबमधील विजय मोठा आहे. यावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंजाबमध्ये क्रांती आली आहे, आज मोठमोठ्या खुर्च्या हलल्या आहेत. तेथे असलेली सर्व मोठी नावे धुळीस मिळाली आहेत. आम्ही प्रामाणिकपणाचं राजकारण सुरू केले आणि संपूर्ण व्यवस्थाच बदलून टाकली.
#WATCH | AAP national convener Arvind Kejriwal says, “We all love you, Punjab,” after his party sweeps #PunjabElections2022 pic.twitter.com/hesu9HGyLI
— ANI (@ANI) March 10, 2022
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, मुलांना शिक्षण देण्याचे काम आम्ही केले आहे. सर्व पक्षांनी आमच्याविरुद्ध कट रचले, ते यशस्वी झाले नाहीत. तेव्हा त्यांनी केजरीवाल दहशतवादी असल्याचं म्हटलं. पण केजरीवाल दहशतवादी नसून देशाचे सच्चे पुत्र असल्याचे आज देशातील जनतेने दाखवून दिल्याच केजरीवाल यांनी नमूद केलं. तसेच आपण असा भारत घडवू जिथे प्रत्येकाच्या मुलांना शिक्षण मिळेल, असंही केजरीवाल म्हणाले.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या झंझावाताने सर्वांची तारांबळ उडाली आहे. येथे दिग्गजांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आम आदमी पक्षाच्या लाटेने सर्व समीकरणे उद्ध्वस्त केली आहेत.