मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापण झाल्यापासून रोज नवनवीन चर्चा समोर येत आहेत. त्यातच आता राज्य सरकाच्या दोन मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. मात्र, माध्यमांनी दिलेल्या या वृत्ताबाबत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे की, ‘आपल्या जिवाला धोका आहे. यामुळे मला सुरक्षा वाढवावी अशी मागणी मी केल्याचं सर्व माहिती खोटी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. मी माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलं नाही.’ असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.