Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या आघाड्यांबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा सुरू केली आहे. काही आघाड्यांची ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली, तरी अंतिम निर्णय अजूनही चर्चेत आहे.
अशात नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शहा जळगाव दौऱ्यावर आले होते. अमित शाह मागील दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाह यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. या दौऱ्यात अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जागावाटपावर चर्चा केली.
या बैठकीत भाजपा शिवसेनेला 13 जागा द्यायला तयार आहे. एकनाथ शिंदे यांनी 18 जागांची मागणी आहे. शिंदे गटाला हव्या असणाऱ्या उर्वरित पाच जागांचा निर्णय सर्वेनुसार होऊ शकतो. या बैठकीत अशी चर्चा झाली की जिंकलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्यायला भाजपा तयार आहे.
अमित शाह हे शिंदेंना विविध मतदारसंघातील ग्राउंड रिॲलिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेचे काही उमेदवार जिंकणार नाहीत, तिथे भाजपा जिंकू शकते, असा अमित शाह यांचा सूर आहे. फक्त एकनाथ शिंदे किती जागांवर राजी होतात हे महत्त्वाच आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या सर्व 13 विद्यमान खासदारांना तिकीट द्या, अशी एकनाथ शिंदेंची मागणी आहे.
तत्पूर्वी, भाजप महाराष्ट्रातील 48 पैकी 32 जागांवर निवडणूक शक्यता वर्तवण्यात येतीय. उर्वरित जागांपैकी 10 जागा शिवसेनेला (शिंदे गट) देण्यात येणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गटाच्या) पदरात दोन ते तीन जागा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
अमित शाह यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सल्ला दिल्याचे समजते आहे, ते म्हणाले,’हट्ट सोडा असे केवळ आपल्या दोघांनाच माझे म्हणणे नाही. भाजपचे नेतेदेखील अशा काही जागांसाठी अडून बसले असतील की जिथे भाजपपेक्षा मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, तेथे भाजपनेदेखील एक पाऊल मागे घेतले पाहिजे, असे शाह म्हणाल्याचे समजते.
हेही वाचा
जागावाटपावरून अमित शाह ‘शिंदे – पवार’ यांना दिला सल्ला म्हणाले,’हट्ट नको…’