अभिनेत्री राधिका आपटेचे म्हणणे आहे की, ती सोयीस्करपणे कोणत्याही गोष्टींमध्ये अडकू किंवा समाधानी राहू इच्छित नाही. न ही ती प्रसिद्धीच्या मागे धावत आहे. राधिका म्हणाली, मी यश आणि अपयश गांभीर्याने घेत नाही. कारण हे तात्पुरते आहेत. एकतर आपण ते गांभीर्याने घ्यायचे नाही. परंतु त्याकडे दुर्लक्ष देखील करू शकत नाही. ते आपल्या प्रवासामधील महत्त्वाचे पैलू आहेत.
राधिका म्हणाली, आपल्याला प्रशंसेची गरज असते आणि आपल्या पाठीवर कोणीतरी शाब्बासकीची थाप देणारेही हवे असतात. तसेच कामाचे कौतुकदेखील करणारे हवेत. याशिवाय आपण अपयशापासून काहीतरी शिकले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत निराश न होता त्याचा सामना करावा. यासाठी मी सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवते.
दरम्यान, राधिकाने 2005मध्ये “वाह! लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारत बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. यानंतर तिने “शोर इन द सिटी’, “कबाली’, “फोबिया’, “बदलापूर’ आणि “अहल्या’ यासारख्या चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय “लस्ट स्टोरीज’, “सेक्रेड गेम्स’, “पॅड मॅन’ आणि “घोल’ या चित्रपटातील भूमिकांमधून तिने बॉलीवूड नायिकांच्या रुढीवादी प्रतिमेला धक्का देत नवीन ओळख निर्माण केली आहे.