जळोची -करोनामुळे गेली अनेक दिवस तहसील कचेरीत सुनावण्या होऊ शकल्या नाहीत. तहसीलदार कचेरीत गर्दी होऊ नये, व करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी यापुढे तहसील कचेरीत होणाऱ्या सुनावण्या बारामतीती तालुक्यातील आठही मंडलात महिन्यातील ठराविक दिवशी होणार आहे.
या अभिनव संकल्पनेची सुरुवात पणदरे मंडलात सुरु करण्यात आली आहे. या मंडला अंतर्गत येणाऱ्या 18 गावातील विविध तक्रारींची सुनावणी तहसीलदार विजय पाटील यांनी घेतली. यावेळी मंडलाधिकारी रवी पारधे, तलाठी एल. एस. मुळे, आर.एन. कोल्हे, ए. ए. भगत, डी. एस. तलवार, उज्ज्वला भगत, कोतवाल पांचाली जगताप व तक्रारदार उपस्थित होते. दरम्यान प्रत्येक मंडलात सुनावणी घेणाचा उपक्रम लोक हिताचा असुन यामुळे तक्रारदाराचा वेळ व पैसा वाचणार आहे अशी माहिती तलाठी एल.एस.मुळे यांनी दिली
बारामती तहसीलदार कचेरीत दरमहा तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या तहसीलदरांकडे असलेल्या रस्ता, दरखास्त, अतिक्रमण व महसुला अंतर्गत येणाऱ्या विविध तक्रारींवर सुनावणी होत असते. त्यामुळे तक्रारदारास सुनावणी तारखेला बारामती येथे कचेरीत हजर व्हावे लागते. मात्र, आता या सुनवण्या मंडलात होणार आहेत.