Gulabrao Patil on Swearing : काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड झाले त्यातून अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आणखी एक सूचक विधान केले आहे.
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिरपूर येथील एका कार्यक्रमा दरम्यान राज्यात झालेल्या आतापर्यंतच्या तीनही शपथविधी विषयी वक्तव्य केले आहे, त्यांनी, “पाच वर्षांत सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तीनही टाईम शपथविधी झाले. या तीनही वेळा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो, असे वक्तव्य केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “पाच वर्षांत अशी कोणतीच पार्टी नाही की जिने सरकार चालवलं नाही. मात्र 35 वर्ष ज्यांच्याबरोबर काढली, त्यांना सोडून दुसऱ्यांसोबत जाऊन त्यांचा देखील विश्वास संपादन करणे हे आपल्यासारख्या माणसासाठी फार कठीण काम होत, असेही मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटले.
त्यासोबतच विद्यार्थ्यांचे आणि आमचं सारखंच आहे असे म्हणत, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसारखं आम्हाला देखील नापास झालं तर पाच वर्ष थांबावं लागतं. 17 नंबरचा फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागते. त्यातही जमलं नाही तर, चाललं आपल्या घरी, अशी परिस्थिती असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी यावेळी म्हटले.