पुणे- पुण्यातील अपघातानंतर पुणे पोलिसांनी जी कामगिरी केली त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या अपघातानंतर रस्त्यावर सगळीकडे काचा अस्ताव्यस्त झाल्या होत्या.
दरम्यान, यावेळी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील सर्व काचांची विल्हेवाट लावून उत्तम कामगिरी बजावली. सध्या पुणे पोलिसांचे सर्वच स्तरातून जोरदार कौतुक होत आहे.