नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील हजारो तरुणांना मोठं गिफ्ट दिले आहे. आज पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 70,000 हून अधिक तरुणांना सरकारी नोकरीच्या नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, ज्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस संस्मरणीय आहे आणि देशासाठी एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे, असे म्हटले.
देशभरात एकूण ४४ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोदींनी तरुणांना सामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्यास सांगितले, कारण जनता-जनार्दन हे ईश्वराचे रूप आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये 70,000 हून अधिक नवनियुक्त नियुक्ती पत्रांच्या वितरणाचे उद्घाटन केले.
Rozgar Mela is an attempt to empower the youth and encourage their active engagement in the nation’s progress. https://t.co/SIcjs5DlkB
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2023
यावेळी बोलताना पंतप्रधान, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश विकासाच्या ध्येयावर काम करत असताना सरकारी नोकरीत सहभागी होण्याची मोठी संधी आहे. तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे. नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व तरुणांचे मी अभिनंदन करतो.” असे म्हणाले.
दरम्यान, देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी विविध सरकारी विभागांमध्ये रुजू होतील. यामध्ये आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, रेल्वे मंत्रालय, लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग आणि गृह मंत्रालयाचा समावेश आहे.
आज जिन लोगों को नियुक्ति पत्र मिल रहे हैं, उनके लिए यादगार दिन है और देश के लिए भी बहुत ऐतिहासिक दिन है: PM @narendramodi pic.twitter.com/gthYAono5L
— PMO India (@PMOIndia) July 22, 2023
पीएमओ इंडियाने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 1947 मध्ये या दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी संविधान सभेने तिरंगा सध्याच्या स्वरूपात स्वीकारला होता. या महत्त्वाच्या दिवशी, तुम्हा सर्वांना शासकीय सेवेसाठी जॉईनिंग लेटर मिळणे ही खूप मोठी प्रेरणा आहे. यावेळी पीएम मोदींनी नवीन सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्या तरुणांनाही संबोधित केले. ते म्हणाले की, भारत अवघ्या 9 वर्षात जगात 10व्या ते 5व्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था बनली आहे. आज प्रत्येक तज्ञ म्हणत आहे की काही वर्षात भारताचा समावेश जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये होईल. ते म्हणाले की भारतासाठी ही एक असामान्य कामगिरी ठरणार आहे. याचा अर्थ प्रत्येक क्षेत्रात रोजगार वाढणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्नही वाढणार आहे.